हनुमान जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भगवान हनुमानाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जो शक्ती, भक्ती आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 15 व्या दिवशी साजरा केला जातो, जो मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो. भक्त प्रार्थना, पूजा आणि उपवास करून हा दिवस साजरा करतात. ते हनुमान मंदिरांना भेट देतात आणि हनुमान चालिसाचे पठण करतात, देवतेला समर्पित एक स्तोत्र. हनुमान जयंती या शुभ दिवशी भगवान हनुमानाची पूजा करणार्‍या भक्तांना सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी आणते असे मानले जाते.

हनुमान जयंती माहिती मराठी – Hanuman Jayanti Information in Marathi

Hanuman color photo

हनुमान जयंती’ म्हणजे हनुमानाच्या जन्माचा उत्सव. हा सण चैत्र पौर्णिमेला असतो. रामनवमीच्या पाठोपाठ हनुमान जयंती येते. श्रीराम म्हटले की हनुमानाची आठवण होते. कारण हनुमान हा श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त आणि सेवक.

राजा दशरथाला मुलगा नसल्यामुळे त्याने पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. तेव्हा अग्नीने प्रकट होऊन त्याला प्रसाद दिला व त्या प्रसादाचे तीन वाटे करून आपल्या तीन राण्यांना देण्यास सांगितले. त्यातला काही भाग एका घारीने पळवला. केसरी नावाच्या वानराची बायको अंजनी जिथे तपश्चर्या करत होती, तिथून ती घार उडत असताना तो प्रसाद घारीच्या पंजातून निसटून अंजनीच्या हातात पडला. त्या प्रसादामुळे तिच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला.

हनुमानाच्या जन्माची अशीही गोष्ट सांगतात की, केसरी नावाचा एक वानर होता. त्याची बायको अंजनी हिने मूल होण्यासाठी शंकराची आराधना केली; आणि तिला जो मुलगा झाला तो हनुमान.

हनुमान वानर होता, पण वानर म्हणजे माकड नव्हे. वानर हे बहुधा दंडकारण्यातले मूळ रहिवासी असावेत. ‘वा-नर’ या शब्दाच्या मूळ संस्कृत व्युत्पत्तीप्रमाणे- ‘हा माणूस तर नव्हे,’ अशी शंका येण्याइतका माणसासारखा प्राणी. त्यांचे पोशाख, तोंडे रंगवण्याची पद्धत व खोडकर स्वभाव यामुळे त्यांना ‘वानर’ म्हणत असावेत. वानरांचे राज्य दक्षिण हिंदुस्थानात होते व किष्किंधा ही त्यांची राजधानी होती.

हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला पहाटे झाला. जन्मल्यानंतर थोड्याच वेळात, उगवता सूर्य म्हणजे लाल रंगाचे एखादे फळ आहे असे वाटून बाल हनुमानाने आकाशात उडी घेतली आणि सूर्याला पकडण्याचा प्रयत्न केला. सूर्य घाबरला तेव्हा सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र फेकले, ते हनुमानाच्या हनुवटीला लागले. तेव्हा सूर्याला पकडण्याचा प्रयत्न सोडून हनुमान आपल्या आईकडे परत आला. हनुमान किती शक्तिमान होता हे दाखवण्यासाठी ही गोष्ट सांगतात.

हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. तसेच मरुत् किंवा वायूचा पुत्र म्हणून त्याला मारुती असेही म्हणतात. तो ब्रह्मचारी आणि अतिशय शक्तिमान होता तसेच तो विद्वानही होता. रामायणात असे सांगितले आहे की, हनुमान अतिशय शुद्ध भाषा बोलत असे. त्याचे भाषा व व्याकरणाचे ज्ञान पाहून श्रीरामही चकित झाले होते. तो श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त होता.

रामायणाच्या कथाभागात, श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले, श्रीराम व लक्ष्मण तिचा शोध घेत असताना त्यांची सुग्रीवाशी गाठ पडली; इथून हनुमानाचा रामकथेत प्रवेश होतो. सीतेचा शोध करण्यासाठी सुग्रीवाने आपले वानर सैनिक सर्व दिशांना पाठवले, त्यात हनुमान दक्षिण दिशेला गेला. सीतेला खूण म्हणून दाखवण्यासाठी रामाने आपली अंगठी त्याच्याबरोबर दिली होती.

शोध घेत घेत दक्षिणेचा समुद्र ओलांडून तो लंकेत पोहोचला. लंका ही रावणाची राजधानी. इथे त्याला अशोकवनात सीता सापडली. हनुमानाने सीतेला श्रीरामाची अंगठी दाखवून श्रीराम तिला सोडवायला येत असल्याचा निरोप सांगितला.

खरे पाहता, हनुमान स्वतःच्या बळावर सीतेला अशोकवनातून सोडवून श्रीरामाकडे परत नेऊ शकला असता; पण तो श्रीरामाचा दूत म्हणून आला होता, म्हणून त्याने तसे केले नाही. सीतेला निरोप सांगून झाल्यानंतर त्याने अशोकवनातील झाडे उपटायला सुरुवात केली. काही वेळाने त्याला पकडायला आलेल्या रावणाच्या सैनिकांकडून पकडून घेऊन तो रावणाच्या दरबारात गेला. तिथे त्याने आपण श्रीरामाचा दूत असून रावणाने सीतेला सोडून द्यावे, असे सांगितले. तेव्हा रावणाने त्याच्या शेपटीच्या टोकाला कापडं बांधून आग लावून दिली. हनुमानाने आपल्या शेपटीने लंकेत सर्वत्र आगी लावल्या, मग शेपटी समुद्रात बुडवून विझवली आणि तो परत श्रीरामाकडे आला.

पुढे श्रीरामाच्या सैन्याबरोबर हनुमान पुन्हा लंकेत गेला. श्रीरामाच्या आणि रावणाच्या सैन्यांमध्ये मोठे युद्ध झाले. एकदा लक्ष्मण लढता लढता बेशुद्ध झाला. तेव्हा लक्ष्मणाला ज्या औषधाची जरूर होती ते त्याला वेळेवर मिळावे, म्हणून वनौषधींची झाडे असलेला सबंध द्रोणागिरी पर्वतच हनुमानाने उचलून आणला आणि लक्ष्मणाचा जीव वाचवला.

रावणाला मारून श्रीरामाने बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. नंतर तो लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येला परत आला. त्यानंतर मात्र हनुमान नेहमी श्रीरामाबरोबर राहिला. राम-सीतेच्या कुठल्याही चित्रात श्रीरामासमोर हात जोडून उभा असलेला हनुमान असतोच.

हनुमान जयंतीच्या दिवशी पुरुष देवळात किंवा घरी मारुतीची पूजा करतात. हनुमानाची देवळे भारतात सगळीकडे आहेत. पण महाराष्ट्रात रामदास स्वामींनी रामभक्तीबरोबर मारुतीची भक्ती वाढवली.

पुढे वाचा:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हनुमान जयंती म्हणजे काय?

हनुमान जयंती हा हिंदू सण आहे जो भगवान हनुमानाचा जन्म साजरा करतो, ज्याला हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे देवता मानले जाते.

हनुमान जयंती कधी साजरी केली जाते?

हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या (उज्ज्वल अर्ध्या) 15 व्या दिवशी साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च किंवा एप्रिलमध्ये येते.

हनुमान जयंती का साजरी केली जाते?

हनुमान जयंती भगवान हनुमानाचा जन्म आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये त्यांचे महत्त्व यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. भगवान हनुमान त्यांच्या सामर्थ्य, निष्ठा आणि भगवान रामाच्या भक्तीसाठी ओळखले जातात.

हनुमान जयंती कशी साजरी केली जाते?

हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात आणि पूजा करतात. ते हनुमान मंदिरांनाही भेट देतात, देवतेला फुले, मिठाई आणि फळे देतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि हनुमान चालीसा, भगवान हनुमानाला समर्पित स्तोत्र पठण करतात.

हनुमान चालिसा म्हणजे काय?

हनुमान चालिसा हे भगवान हनुमानाला समर्पित एक भक्तिगीत आहे. 16 व्या शतकात तुलसीदासांनी रचलेली ही 40 श्लोकांची कविता आहे. असे मानले जाते की हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान हनुमानाकडून सौभाग्य आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

हनुमान जयंती फक्त भारतातच साजरी होते का?

हनुमान जयंती प्रामुख्याने भारतात साजरी केली जाते, परंतु ती नेपाळ, श्रीलंका आणि बाली सारख्या इतर देशांतील हिंदू देखील साजरी करतात.

भगवान हनुमानाचे महत्त्व काय आहे?

भगवान हनुमान त्यांच्या भक्ती, धैर्य आणि शक्तीसाठी ओळखले जातात. त्यांना निष्ठा आणि नि:स्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. त्यांनी हिंदू महाकाव्य रामायणात भगवान रामाला त्यांची पत्नी सीतेला राक्षस राजा रावणापासून वाचवण्यास मदत करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Leave a Reply