Ram Navami Information in Marathi : भारतीय भूमी ही नेहमीच पवित्र भूमी राहिली आहे, इतिहासानुसार येथे अनेक देवी-देवतांनी अवतार घेतला आहे. या इतिहासावर लक्ष केंद्रित केले तर जेव्हा रावणाचे अत्याचार खूप वाढले आणि लोक अस्वस्थ झाले, तेव्हा पुन्हा या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी भारतीय भूमीवर महापुरुषाचा जन्म झाला. या महापुरुषाचे नाव भगवान राम होते, ज्यांनी रावणाच्या अत्याचारातून मुक्ती मिळवली आणि त्यावेळी लोकांचे रक्षण केले. त्रेतायुगात जन्मलेल्या भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

रामनवमी मराठी माहिती-Ram Navami Information in Marathi
रामनवमी मराठी माहिती, Ram Navami Information in Marathi

रामनवमी मराठी माहिती – Ram Navami Information in Marathi

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात. या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तन होते. लोकांना सुंठ-साखरेचा प्रसाद वाटला जातो.

रामनवमीचा इतिहास – Ram Navami History in Marathi

पृथ्वीवर पाप वाढले, दुष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की, त्यांचा नाश करण्यासाठी श्रीविष्णू अवतार घेतात असे मानतात. श्रीराम हा दशावतारातील सातवा अवतार आहे. लंकेचा राक्षस राजा रावण याने श्रीशंकरांकडून वर मिळवला आणि तो गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला. रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णूच श्रीरामांच्या रूपाने अवतरले.

अयोध्येचा राजा दशरथ याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा तीन राण्या होत्या; पण मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता.

एकदा दशरथ राजा शिकारीला गेला असताना रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी बसला होता. तेव्हा श्रावण नावाचा ब्राह्मणकुमार आपल्या वृद्ध आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता. आई-वडिलांना तहान लागल्यामुळे तो पाणी घ्यायला तलावापाशी आला. दशरथाला केवळ आवाज ऐकून अचूक बाण मारता येत असे. श्रावणाचा तलावातील पाणी घेण्याचा आवाज ऐकून दशरथाने त्या दिशेने बाण मारला. तो श्रावणाला लागला आणि तो मरण पावला. त्याच्या आई-वडिलांनी दुःखाने प्राण सोडले व मरता मरता राजा दशरथाला शाप दिला की, तूही पुत्रशोकाने प्राण सोडशील.

राजा दुःखी होऊन परत आला आणि त्याने आपले कुलगुरू वसिष्ठमुनी यांना सर्व हकिकत सांगितली.

वसिष्ठमुनींनी दशरथाच्या हातून नकळत घडलेल्या पापाचा दोष जाण्यासाठी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला. त्यानंतर त्यांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलावून त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. तेव्हा अग्निदेवाने प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला. तो त्याने कौसल्या, सुमित्रा व कैकयी या आपल्या तीन राण्यांना दिला. त्या प्रसादाने त्यांना चार मुलगे झाले. थोरली राणी कौसल्या हिला जो मुलगा झाला, तो श्रीराम. सुमित्रेचा लक्ष्मण नि कैकयीचे भरत व शत्रुघ्न.

मोठे झाल्यावर श्रीराम वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षे वनवासाला गेले, ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यानंतर दशरथाचा पुत्रशोकामुळे मृत्यू झाला.

वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले, तेव्हा श्रीरामांनी वानरसेनेसह लंकेवर चालून जाऊन युद्धात रावणाचा वध केला व आपले अवतारकार्य पूर्ण केले.

श्रीराम हे भारतवासीयांचे फार आवडते दैवत आहे. श्रीराम हे एक आदर्श पुरुष होत. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम असेही म्हणतात. मातृ-पितृभक्ती, बंधुप्रेम, सत्य-वचनाचे व्रत, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. ते एकवचनी होते. त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला ‘रामराज्य’ असे म्हणतात.

श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगतात. रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र त्यांच्याकडून म्हणवून घेतात. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. इतकेच काय, एकमेकांशी कुठेही गाठ पडली, तरी लोक याच रामनामाने एकमेकांना अभिवादन करतात व म्हणतात ‘राम राम!’

रामनवमी मराठी माहिती, Ram Navami Information in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न 1: 2022 मध्ये रामनवमी कधी आहे?

उत्तर: 10 एप्रिल

प्रश्न 2: रामनवमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

उत्तर: 11:06 ते 13:38

प्रश्न 3: रामनवमी कधी येते?

उत्तर: रामनवमी चैत्र महिन्याच्या नवरात्रीच्या नवव्या तारखेला असते.

प्रश्न 4: राम नवमीला राम नवमी का म्हणतात?

उत्तर: कारण याच दिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता.

प्रश्न 5: चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे?

उत्तर: २ एप्रिलपासून

Leave a Reply