कस्तुरबा गांधी मराठी निबंध – Kasturba Gandhi Marathi Nibandh

कस्तुरबा म्हणजे सर्व भारतीयांची ‘बा’ – आई! महात्मा गांधीजींच्या पत्नी. त्या स्वत:च्या तेजस्वी कार्याने जगभर विख्यात झाल्या. त्यांचा जन्म १८६९ साली झाला. एका सुखी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. वयाच्या १३व्या वर्षी त्यांचा महात्मा गांधींशी विवाह झाला.

महात्मा गांधींनी आयुष्यभर स्वातंत्र्यासाठी लढे दिले. त्या सर्व चळवळींमध्ये कस्तुरबांनी अत्यंत निर्भयपणे गांधीजींना साथ दिली. महात्माजींनी साबरमतीला आश्रमाची स्थापना केली. कस्तुरबांनी आश्रमातील जीवन आनंदाने स्वीकारले. आश्रमातील कष्टाची सर्व कामे त्या करत.

कस्तुरबांनी चंपारण्यामधील सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला. सविनय कायदेभंगाच्या अनेक सत्याग्रहांत त्या सहभागी झाल्या. त्यांनी अनेकदा तुरुंगवास पत्करला. त्या १९४२च्या लढ्यात सहभागी झाल्या.

त्यावेळी त्यांना आगाखान पॅलेसमध्ये कारावासात ठेवण्यात आले. दीड वर्षाच्या त्या तुरुंगवासामुळे त्या आजारी पडल्या. आजारपणामुळे १९४४ साली त्यांचे निधन झाले.

कस्तुरबा गांधी मराठी निबंध-kasturba gandhi marathi nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply