ऑलिंपिक खेळ मराठी निबंध – Olympic Khel Marathi Nibandh

ऑलिंपिक ह्या जागतिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात हे आपल्याला ठाऊक आहेच. ह्या स्पर्धांत जगातील ६००० हून अधिक खेळाडू आणि १०० हून अधिक देश भाग घेतात. ह्या वर्षी म्हणजे २०१६ साली त्या ब्राझीलमधील रिओ डी जानिरो येथे त्या भरणार आहेत हे ब-याच लोकांना माहिती असेल.

खरोखर हा क्रीडामहोत्सव मोठा अद्भूतच म्हणावा लागेल असा आहे. ह्या खेळाचे ऑलिंपिक असे नाव ग्रीसमधील ऑलिंपस ह्या पर्वतावरून पडले. असे म्हणतात की इस पूर्व ७७६ मध्ये हर्युलसने ऑलिव्हचे झाड उचलून ऑलिंपस पर्वतावर आणले. तेव्हापासून ह्या स्पर्धा दर चार वर्षांनी होऊ लागल्या. प्राचीन काळी ग्रीस हा एक संपन्न देश होता. तेथील लोक कला आणि क्रीडाप्रेमी होते. ह्या स्पर्धांमध्ये सुरूवातीला फक्त धावण्याच्याच स्पर्धा होत असत. नंतर मग इतरही स्पर्धा होऊ लागल्या. हा समारंभ म्हणजे ग्रीसमधील खूप मोठा धार्मिक उत्सवच होता. पहिल्या दिवशी धार्मिक पूजा होऊन पशूबळी देऊन देवतांना आवाहन केले जात असे. त्या स्पर्धांत बक्षिसे जिंकणा-या माणसाला महान वीर समजले जाई. त्याचे ठिकठिकाणी पुतळे उभारले जात. पुढे ग्रीस रोमच्या ताब्यात गेल्यावर ह्या स्पर्धांवर बंदी आली. त्यानंतर हे खेळ सुरू होण्यासाठी १५०० वर्षांचा काळ जावा लागला.

आधुनिक काळातील ऑलिंपिक स्पर्धा १८७६ साली ग्रीसमध्ये अथेन्स येथे घेण्यात आल्या. त्यावेळे एकुण ४३ स्पर्धांमध्ये १४ देशांतील २४१ क्रीडापटूंनी भागघेतला होता. आज ह्या स्पर्धा संपूर्ण जगात मानवता, बंधुता, एकता आणि सहकार्याचे प्रतिक मानल्या जात असल्या तरी त्यांचे आयोजन करण्याचा खर्च अफाट आहे. त्यामुळे केवळ विकसित आणि समृद्ध देशच त्यांचे आयोजन करू शकतात.

अमेरिका आणि चीन हे देश ह्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवण्यात अग्रेसर आहेत. मात्र काही खेळाडूंवर उत्तेजक द्रव्ये प्राशन केल्याचेही आरोप झालेले आहेत.

भारतातील पी. टी. उषा हिचे १९८४ साली ऑलिंपिकचे कास्यपदक केवळ काही सेकंदांनी हुकले. २०१२ साली आपल्या देशाला एक रजत आणि तीन कास्य पदके मिळाली. सुशीलकुमार (मुष्टियुद्ध- रजतपदक), सायना नेहवाल (बॅडमिंटन-कास्यपदक), मेरी कोम (मुष्टियुद्ध-कास्य पदक) आणि गगन नारंग (रायफल-शुटिंग-कास्य पदक) अशी ती पदके आहेत.

ह्या स्पर्धांचा स्वतंत्र ध्वज आहे आणि स्वतंत्र घोषणाही आहे. ह्या स्पर्धा आपल्या देशात व्हाव्या म्हणून ब-याच देशांत चुरस असते. ज्या देशाला तो मान मिळतो तो स्वतःला भाग्यशाली समजतो. तिथे आनंद, उत्साह ओसंडून वाहू लागतो. त्यांचा खर्च जरी बराच झाला तरी त्या खेळांमुळे दसपट उत्पन्न त्या देशाला मिळते. कारण हजारो पर्यटक येतात, टीव्ही आणि प्रसारमाध्यमांचे हक्क विकले जातात.

खरोखर ह्या खेळाचे आयोजन ही गौरवाची बाब आहे. जगभर क्रीडेची आवड निर्माण करणा-या ह्या स्पर्धा आहेत असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

ऑलिंपिक खेळ मराठी निबंध – Olympic Khel Marathi Nibandh

इ. स. १८७६ पासून आधुनिक ऑलिंपिक खेळांची कथा सुरू होते. याच वर्षी फ्रान्सचे एक शिक्षणतन्ज काटिनने याचे पुनरुज्जीवन करून पहिली स्पर्धा ग्रीसमधील अथेन्स नगरात आयोजित केली. तेव्हापासून हे खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जातात. यात जगातील ६००० पेक्षा जास्त खेळाडू आणि १०० पेक्षा जास्त राष्ट्रे भाग घेतात. ऑलिंपिक २००० आस्ट्रेलियातील सिडने येथे आयोजित करण्यात आले होते. हा खेळांचा महोत्सव जगातील सर्वात मोठा अनोखा कार्यक्रम होता. इ. स. १९२४ पासून शीत ऑलिंपिक स्पर्धा दा चार वर्षांनी वेगळ्या आयोजित केल्या जातात.

ऑलिंपिक खेळ जगातील विविध प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जातात. १९९६ चे ऑलिंपिक खेळ अमेरिकेतील अटलांटा शहरात घेण्यात आले होते. यात जगातील १९७ राष्ट्रांनी भाग घेतला होता. आतापर्यंत या खेळांच्या स्पर्धा अथेन्स, पॅरिस, लंडन, अॅमस्टरडॅम, लॉसएंजेलिस, बर्लिन, हेलसिंकी, मेलबोर्न, रोम, टोकियो, मक्सिको, म्युनिच, मॉस्को, सेऊल, बार्सिलोना अटलांटा, सिडने या शहरांत झाल्या. इ. स. १९१६, १९४०, १९४४ मध्ये जागतिक युद्धामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. या खेळांमध्ये अनेक स्पर्धा असतात. खेळांची सुरवात फारच मोठ्या प्रमाणावर वा शानदार केली जाते. प्रथम ऑलिंपिक मशाल पेटवितात नंतर आकर्षक मनोरंजक कार्यक्रम होतात. यात प्रत्येक देशाचे खेळाडू आपल्या देशाच्या ध्वजासह परेडमध्ये भाग घेतात. प्रेक्षकांची अफाट गर्दी असते. या खेळांच्या स्पर्धा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालतात.

१९२८ पासून भारत यात सहभागी होत आहे पण आतापर्यंत चांगले सादरीकरण झाले नाही. आता चांगले सादरीकरण करून काही सुवर्णपदके मिळविण्याची आशा करू. या खेळांचा मुख्य उद्देश, बंधुभाव, समता, सहिष्णुता आणि वीरत्वाचे गुण निर्माण करणे व विविध देशांना परस्परांच्या निकट आणणे हा आहे.

या खेळांचे ऑलिपिक हे नाव ग्रीसमधील ‘ऑलंपिस’ या पर्वतावरून पडले. प्राचीन ग्रीसमधे दर चौथ्या वर्षी या पर्वताच्या पायथ्याशी या स्पर्धा घेतल्या जात. त्यात सर्व खेळाडू भाग घेत आणि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करीत. या स्थळालाच ऑलिपिक म्हणत. त्या काळी ग्रीस एक संपन्न देश होता. तेथील लोक कला व खेळांचे प्रेमी होते. सुरवातीला फक्त धावण्याची स्पर्धा होत असे परंतु हळूहळू दुसन्या स्पर्धा हाऊ लागल्या.

हा समारंभ ग्रीसमधील एक मोठा उत्सव होता. त्यात भाग घेऊन बक्षिसे जिंकणा-याला देशाचा महान वीर समजले जाई. साऱ्या देशाला त्याचा अभिमान वाटे अशा वीरांना देवाप्रमाणे समजले जाई. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे उभे केले जातात कालांतराने ग्रीस रोमच्या ताब्यात गेले. इ. स. ३९३ मध्ये एका रोमन राजाने यावर बंधन टाकले. रोमचे राजे ख्रिश्चन होते व या स्पर्धाना अधार्मिक मानत. परंतु ग्रीसमध्ये हे खेळ एक धार्मिक अनुष्ठानाचाच भाग होते. त्याची सुरवात धार्मिक पूजेने होत असे. हा समारंभ ५ दिवस चालत असे. पहिल्या दिवशी पूजेनंतर पशुंचे बळी देत व देवतांना आवाहन करीत शेवटच्या दिवशी बक्षिसे दिली जात आणि कबुतरे सोडत. जे विजयी वोरांची नावे देशातील विविध शहरांमध्ये पोहोचावीत.

हे खेळ पुन्हा सुरू होण्यासाठी १५०० वर्ष लागली. आज हे संपूर्ण जगात मानवता, बंधुता, एकता, सहकार्याचे प्रतीक बनले आहे. या खेळाची सर्व जण वाट पाहतात. सुरवातीपासून मोठ्या प्रमाणावर त्याची तयारी केली जाते. ऑलिपिकचो मशाल प्राचीन ग्रीस आणि आधुनिक ऑलिंपिक खेळांना जोडणारा एक दुवा आहे. ! या खेळांचा स्वतंत्र ध्वज आहे घोषणा आहे. हे आयोजित करण्यासाठी विविध देशांमध्ये स्पर्धा असते. ज्या देशावर हे खेळ आयोजित करण्याची जबाबदारी टाकली जाते तो देश स्वत:ला भाग्यशाली समजतो. तेव्हापासूनच तिथे आनंद उल्हास, उत्साह असतो. मोठ्या प्रमाणावर खर्चिक तयारी सुरू होते. म्हणून फक्त विकसित श्रीमंत देशच ही जबाबदारी घेतात. परंतु यापासून त्या देशाला उत्पन्नही खूप मिळते. हजारो प्रेक्षक, पर्यटक येतात त्यामुळे यजमान राष्ट्राला परकीय चलन मिळते. या खेळांचे आयोजन ही गौरवाची, नाची बाब आहे. शक्य आहे कधी भारतालाही हा मान ठेरल.

पुढे वाचा:

Leave a Reply