दहशतवाद एक समस्या निबंध मराठी – Dahashatwad Ek Samasya Marathi Nibandh

आपल्या देशाचे दोन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी आणि कै. राजीव गांधी ह्या दोघांचाही बळी दहशतवादानेच घेतला आहे हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही.

वाढत्या दहशतवादाची समस्या ही केवळ भारतातलीच नव्हे तर जगभरातली समस्या होऊन बसली आहे. आज सारे जगच ह्या ना त्या प्रकारे दहशतवादाच्या मगरमिठीत सापडले आहे. भीती दाखवून, दहशत निर्माण करून, देशात तणाव निर्माण करणे आणि आपल्या मागण्यांसाठी हजारो निरपराध व्यक्तींचा बळी घेणे हे दहशतवादी कारवायांचे स्वरूप असते. दहशतवाद हा राष्ट्रविरोधी असतो, मानवताविरोधी असतो आणि ख-या धर्माच्याही विरोधीच असतो.

जगभरात आणि आपल्या भारतातही दहशतवादाच्या घटना कुठेतरी घडलेल्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. दहशतवादी स्वतःच्या स्वार्थासाठी दहशत पसरवतात आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. ते बॉम्बस्फोट करून बस, गाड्या उडवतात, स्वयंचलित बंदुका घेऊन गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करतात. त्यांच्याकडे जगातली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात. ह्यात कितीतरी निरपराध माणसे बळी पडतात. मानवी हक्क तर अक्षरशः पायदळी तुडवले जातात. लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होते. व्यापारउदीम बंद पडतो आणि देशाची आर्थिक प्रगती कुंठीत होते.

दहशतवाद हा वाळवीसारखा आहे. सर्वसामान्य लोकांचे सुखी जीवन नष्ट करीत तो देशादेशातून पसरत चालला आहे. आपल्या भारतात काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील काही राज्ये दहशतवादाची शिकार बनली आहेत. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे त्या दहशतवादाला चिथावणी देत आहेत. त्यामुळे ह्यावर ठोस उपाय योजणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या सिरिया येथे आयसीस ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. मुसलमानातील शिया आणि सुन्नी हे दोन पंथ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे सिरियातून आणि इराकमधून अनेक गोरगरीब लोक जीवाच्या भीतीने युरोपात निर्वासित म्हणून जात आहेत. युरोपातील काही देश त्यांना घेत आहेत तर काही देशांनी आपले दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले आहेत.

दहशतवाद हा वाईटच. सध्याचा दहशतवाद हा धार्मिक दहशतवाद आहे. तरूणांना धर्माच्या नावावर चिथवले जाते आणि भडकवले जाते. आपल्या देशात तसे होऊ नये ह्यासाठी सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, कौशल्ये शिकवली पाहिजेत आणि रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे तरूण लोक भरकटणार नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. दोन धर्मांत तणाव निर्माण करणा-यांना कडक सजा फर्मावली गेली पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना जागवली पाहिजे. हाच दहशतवाद रोखण्याचा ठोस उपाय आहे.

शस्त्रास्त्रविक्री आणि अंमली पदार्थांची विक्री हे दहशतवादाला पैसे पुरवणारे मुख्य स्त्रोत आहेत, ते मार्ग बंद केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरची फूसही दहशतवादाला कारणीभूत असते. सर्वच राष्ट्रे तात्पुरता फायदा बघत दहशतवादा कडे कानाडोळा करतात. तसे नाही झाले तर हा दहशतवाद नक्कीच आटोक्यात येईल.

वाढता दहशतवाद मराठी निबंध – Dahashatwad Nibandh in Marathi

वाढत्या दहशतवादाची समस्या ही केवळ भारतातलीच नव्हे तर जगभरातली समस्या होऊन बसली आहे. आज सारे जगच ह्या ना त्या प्रकारे दहशतवादाच्या मगरमिठीत सापडले आहे. भीती दाखवून, दहशत निर्माण करून, देशात तणाव निर्माण करणे आणि आपल्या मागण्यांसाठी हजारो निरपराध व्यक्तींचा बळी घेणे हे दहशतवादी कारवायांचे स्वरूप असते. दहशतवाद हा राष्ट्रविरोधी असतो, मानवताविरोधी असतो आणि ख-या धर्माच्याही विरोधीच असतो.

जगभरात आणि आपल्या भारतातही दहशतवादाच्या घटना कुठे ना कुठे घडलेल्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. दहशतवादी स्वतःच्या स्वार्थासाठी दहशत पसरवतात आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. आपल्या देशाचे दोनपंतप्रधान कै. इंदिरा गांधी आणि कै.राजीव गांधी ह्या दोघांचाही बळी दहशतवादानेच घेतला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.

दहशतवादी बॉम्बस्फोट करून बस, गाड्या उडवतात, स्वयंचलित बंदुका घेऊन गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करतात. त्यांच्याकडे जगातली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात. ह्यात कितीतरी निरपराध माणसे बळी पडतात. मानवी हक्क तर अक्षरशः पायदळी तुडवले जातात. लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होते. व्यापारउदीम बंद पडतो आणि देशाची आर्थिक प्रगती कुंठीत होते.

दहशतवाद हा वाळवीसारखा आहे. सर्वसामान्य लोकांचे सुखी जीवन नष्ट करीत तो देशादेशातून पसरत चालला आहे. आपल्या भारतात काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील काही राज्ये दहशतवादाची शिकार बनली आहेत. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे त्या दहशतवादाला चिथावणी देत आहेत. त्यामुळे ह्यावर ठोस उपाय योजणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या सिरिया येथे आयसीस ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. मुसलमानातील शिया आणि सुन्नी हे दोन पंथ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे सिरियातून आणि इराकमधून अनेक गोरगरीब लोक जीवाच्या भीतीने युरोपात निर्वासित म्हणून जात आहेत. युरोपातील काही देश त्यांना घेत आहेत तर काही देशांनी आपले दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले आहेत.

दहशतवाद हा वाईटच. सध्याचा दहशतवाद हा धार्मिक दहशतवाद आहे. तरूणांना धर्माच्या नावावर चिथवले जाते आणि भडकवले जाते. आपल्या देशात तसे होऊ नये ह्यासाठी सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, कौशल्ये शिकवली पाहिजेत आणि रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे तरूण लोक भरकटणार नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. दोन धर्मांत तणाव निर्माण करणा-यांना कडक सजा फर्मावली गेली पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना जागवली पाहिजे. हाच दहशतवाद रोखण्याचा ठोस उपाय आहे.

दहशतवाद – Terrorism Essay in Marathi

आज दहशतवाद ही भारतातील सर्वात ज्वलंत समस्या आहे. सारा भारत या ना त्या प्रकारे या समस्येमुळे भयभीत झालेला आहे. भीती दाखवून, अशांती निर्माण करून, घटनेतील आचार-संहितेचे उल्लंघन करून, देशात एक प्रकारचा तणाव निर्माण करून, अव्यवस्था आणून आपल्या अयोग्य मागण्या मान्य करण्यास लावणारांना दहशतवादी म्हणतात आणि या राष्ट्रविरोधी विचारांना दहशतवाद म्हणतात.

दहशतवादाच्या बातम्या रोज आपण वृत्तपत्रांत वाचतो. उदा. पंजाबात चार जणांची गोळी मारून हत्या, मुंबईला बाँबस्फोट झाला, दोन जणांचा मृत्यू चार जण जखमी, काश्मिरात उच्च अधिकाऱ्याचे अपहरण व हत्या, विदेशी पर्यटकांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांच्या मोबदल्यात दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी इ. ते आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद पसरवितात. आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. भारतात दहशतवादाची समस्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. काश्मीर, पंजाब, आसाम, बिहार, नागालँड इत्यादी राज्यांत दहशतवादाची समस्या खूपच गंभीर बनली आहे.

दहशतवाद वर्तमानकाळात, आज अस्तित्वात आला असे नसून त्याला प्राचीन परंपरा आहे. पूर्वकाळातील शक, हूण, अरब, मोगल, इंग्रज यांनी भारतात दहशत पसरविली. दहशतीच्या आधारे या लोकांनी भारतावर राज्य केले आणि सोन्याची चिमणी समजल्या जाणाऱ्या या देशाला भिकेला लावले. हळूहळू भारतीयांमध्ये दहशतवादाबद्दल चीड निर्माण झाली. त्यांनी संघटित होऊन दहशतवादाला विरोध केला आणि इंग्रजांना पळवून लावले.

आज दहशतवादी तोंडाला काळे फडके बांधून हातात स्वयंचलित हत्यारे घेऊन निघतात आणि निःशस्त्र लोकांवर वार करतात. यात किती तरी मातांचे पुत्र, भगिनींचे भाऊ त्यांच्यापासून हिरावून घेतले जातात. संध्याकाळ होताच गल्लीबोळांत स्मशान शांतता पसरते. लोकांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त होते आणि मनात मृत्यूच्या भयाची छाया असते. व्यापार उद्योग बंद पडतो व देशाची आर्थिक प्रगती थांबते.

दहशतवाद एखाद्या वाळवीप्रमाणे आहे जो आतल्या आत देशाला खाऊन टाकीत आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरत चालला आहे. सरकारने दहशतवादापासून सुटका करून घेण्यासाठी काही ना काही ठोस उपाय अवश्य योजले पाहिजेत. चार सहा महिन्यांनी राज्यपाल बदलणे, दहशतवादी कारवाया वाढताच त्याठिकाणी सेना पाठविणे हा या समस्येवरील उपाय नव्हे. ज्या ज्या वेळी दहशतवाद दडपण्यात आला त्या त्या वेळी देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. याला इतिहास साक्षीदार आहे. पंजाबातील दहशतवाद संपविण्यासाठी इंदिरा गांधींनी खंबीर पावले उचलली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. मे १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येसाठी लिट्टेला दोषी मानले जाते. अत्यंत कडक अशी सुरक्षा व्यवस्था असूनही पंतप्रधानाची हत्या होणे. आमच्या सुरक्षाव्यवस्थेतील उणीवांना उजेडात आणतात.

जगात दोन प्रकारची शासन व्यवस्था मुख्यत्वेकरून अस्तित्वात आहे. एक म्हणजे लोकशाही आणि दुसरी हुकूमशाही. लोकशाहीत दहशतवादाला जागा नाही पण हुकूमशाहीत ती आहे. हुकूमशाही शासन पद्धती असलेले अनेक देश जगात आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही स्थापन झाली. अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी ‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेली प्रशासन व्यवस्था म्हणजे लोकशाही” अशी व्याख्या केली होती. याचे तात्पर्य असे की, यात कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. जनताच मालक आणि जनताच सेवक! जर जनतेला असे वाटले की तिच्या अधिकारांचे हनन होत आहे तर ती सरकारला हटवू शकते. ज्याप्रमाणे १९७७ मध्ये काँग्रेसला हटवून जनता पक्षाला सत्ता प्राप्त झाली. या परिवर्तनशील जगात काहीच एकसारखे असत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळूहळू लोकांची मानसिकता पण बदलली. १९७९ मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यावर गुजरातमध्ये आणि १९७५ मध्ये बिहार प्रांतात दहशतवादी कारवायांनी उग्र स्वरूप धारण केले. आता तर असे प्रतीत होते की जणू सारा भारतच दहशतवादाच्या विळख्यात सापडला आहे.

दहशतवाद अचानक आला नाही. त्याच्या जन्माची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण आहे तरुणांमध्ये शासनव्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण होणे, कोण्या बुद्धिजीवी वा नेत्या आपल्या इच्छापूर्तीसाठी तरुणांना हाताशी धरणे व आपल्या स्वार्थसिद्धीचे साधन बनविणे त्यांच्या साह्याने दंगे धोपे, मारामाऱ्या, लुटालूट, हत्या घडवून आणून समाजात, देशात, भय आणि दहशत पसराविण्याचे कार्य करणे यातूनच दहशतवादाचा जन्म होतो. दहशतवादाचे दुसरे कारण बेकारी आणि गरिबी हे आहे. उच्च शिक्षण घेऊनही जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा तरुणांमध्ये नैराश्य येते. शासनव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनांत चीड निर्माण होते व योग्य मार्गदर्शनाअभावी शास्त्राच्या ठिकाणी शस्त्र धारण करून ते दहशतवादी बनतात. दहशतवाद वाढविण्यात गरिबीचा सिंहाचा वाटा आहे. हे दहशतवादी कुणाचे शत्रू नसतात. पोट भरण्यासाठी, थोड्याशा पैशांसाठी देशात तणाव पसरविण्यासाठी ते तयार होतात. कित्येकदा जास्त पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी कित्येक-जण दहशतवादी बनतात. जेव्हा समाजातील एखादा विशिष्ट वर्ग आपले म्हणणे मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव टाकतो आणि जेव्हा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही तेव्हा तो तोडफोडीला सुरवात करतो. त्यामुळे सरकार आणि जनतेचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. अशा रुष्ट झालेल्या नवयुवकांना शेजारी देश पण मदत करतात. भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध पण झालेले आहे. स्फोटके, हत्यारे त्यांना ते पुरवितात. त्याचबरोबर त्यांना हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण देतात. आर.डी.एक्सच्या प्रयोगामुळे दहशतवाद्यांची मारक क्षमता खूपच वाढली आहे.

हे दहशतवादी कोणत्याही प्रकारच्या समझोत्यासाठी, तडजोडीसाठी तयार होत नाहीत. त्यांचा उद्देश निरपराधी लोकांची हत्या करणे, त्यांचे अपहरण करणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे, देश-विदेशांत राष्ट्रविरोधी प्रचार करणे व त्यांची सहानुभूती मिळविणे, तरुणांना पथभ्रष्ट करून राष्ट्रविरोधी कारवाया करणे हा असतो.

दहशतवाद असाच वाढत राहिला तर एक दिवस आपला देश खंडित होईल. म्हणून सरकारने संसदेच्या चार भिंतीत भांडणे, वादविवाद न करता दहशतवादाचा कठोरपणे विरोध केला पाहिजे. स्वार्थी राजकारणी, बुद्धिजीवींनी शासन करून त्यांना धडा शिकविला पाहिजे. उच्चशिक्षित तरुणांच्या रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे. कुटिरोद्योग व हस्तोद्योग सुरू करुन बेकारीची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेजारी देशांनी चालविलेल्या दहशतवादी कारवायांना तोडीस तोड उत्तर दिले पाहिजे. जे दहशतवादी शरण येण्यास तयार असतील त्यांच्याबाबत उदार धोरण अमलात आणले पाहिजे आणि उरलेल्यांना कठोर शिक्षा देण्यात आल्या पाहिजेत. सीमेवरील घुसखोरी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही कठोर शासन व्हावे.

जर आत्ताच दहशतवादी कारवाया कठोरपणे न थांबविल्या तर आपले आणि देशाचे भविष्य अंध:कारमय होईल. ‘शठेशाठ्यम समाचरेत’ अर्थात दुष्टांबरोबर दुष्टांसारखेच वागणे हीच नीती आहे या सिद्धांताप्रमाणे दहशतवादरूपी नागाला मारलेच पाहिजे तरच भारत सुखी होईल आणि प्रगतिपथावर अग्रेसर होईल.

दहशतवाद मराठी निबंध – Dahashatwad Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply