जल व्यवस्थापन काळाची गरज निबंध मराठी – Jal Vyavasthapan Kalachi Garaj Nibandh Marathi

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा पूर्वापार ज्ञात आहेत. पण सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. लोकसंख्या अफाट वेगाने वाढते आहे व त्यासाठी पाण्याचा वापरही वाढत आहे. पिण्यासाठी, दैनंदिन व्यवहारासाठी, कारखान्यांसाठी आणि शेती उद्योगधंद्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते. पण लोकसंख्यावाढीमुळे जंगले नष्ट होत आहेत. त्याऐवजी सिमेंट-काँक्रीटची जंगले वाढत आहेत. इमारती, रस्ते, पुल आणि कारखाने यांसाठी जंगले साफ केली जात आहेत व त्याचाच परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण घटले आहे आणि मनुष्यासह प्राणीमात्रांनाही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाण्यावाचून तडफडावे लागत आहे.

पृथ्वीवरील एकूण जलसंपत्ती पैकी ९७% जलसंपत्ती महासागर स्वरुपात आहे. त्यामुळे तिचा उपयोग पिण्यासाठी, शेती किंवा उद्योगधंद्यांसाठी होऊ शकत नाही. आणि ३% पैकी २ – २.५०% पाणी स्थायुरुपात आहे. त्यामुळे पिण्यासाठी असे १% पाणी उपलब्ध आहे. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात हा जलसाठा अतिशय तोकडा आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनाच्या दुसऱ्या सुविधा पुरवणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात खुप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

पाणी साठवून ठेवण्यासाठी सर्वात प्रथम गरज आहे. ती वृक्षारोपणाची व त्यांची जोपासना करण्याची कारण झाडाची मुळे जमिनीत खोलवर जावून माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपण्यास व तेथेच साठवण्यास मदत होते.

झाडांचा वाळलेला पालापाचोळा तिथेच पडू दिल्यास पाणी वाहून न जाता तिथेच झिरपते. मातीची धूप टाळली जाते. डोंगर टेकड्यांमध्ये पिके तसेच तत्सम झाडेझुडपे असतील व त्यांना बांध घातले तर पाणी अडवण्यास मोलाची मदत होते. त्यामुळे डोंगर टेकड्यांवरील माती तिथेच टिकून राहते.

पाणी अडवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जागोजागी तलाव बांधणे त्यामुळे पावसाळ्यानंतरही पाणी वापरता येते. धरणे-बंधारे बांधुनही पावसाचे पाणी अडवू शकतो. मोठमोठ्या इमारती तसेच घराच्या छताला पन्हाळ्या लावून ते पाणी घरगुती वापरासाठी वापरता येते. जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी शेताच्या बांधावर गवतासारखी तृणधान्ये तशीच वाढू द्यावीत. हिरवळ वाढवावी, त्यामुळे भूजलसाठा वाढविण्यास मदत होते. जमीनीत झिरपलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपसा न करता पावसाच्या पाण्याचा व जमीनीवरील ओहोळनद्यांचा वापर करावा. त्यामुळेजमीनीत ओलावा टिकून रहातो. जमीनी उघडयाबोडक्या न राहू देता जास्तीत जास्त शेतीसाठी व लागवडीखाली ठेवल्यास जलसंवर्धन करता येते.

समुद्र व महासागरातील अफाट जलसंपत्तीचे गोड्या पाण्यात रुपांतर करणे हाही जलव्यवस्थापनातील प्रमुख फायदा आहे. आपले मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाणयांनी देखील या योजनेला पठिंबा दिला आहे. दुसरा पर्याय हा की नद्यांचे, ओढेओहोळांचे पाणी समुद्रापर्यंत जावू न देता अगोदरच जागोजागी अडवून ठेवणे त्यामुळे खाऱ्या पाण्याचा साठा न वाढता गोड्या पाण्याचा साठा वाढेल. व वर्षभर वापरासाठी टिकून राहिल.

जल व्यवस्थापन काळाची गरज निबंध मराठी – Jal Vyavasthapan Kalachi Garaj Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply