लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी – Essay On Population in Marathi

भारताची लोकसंख्या ही देशाच्या दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे आणि ही लोकसंख्येची वाढअशीच होत राहिली तर देशातील लोकांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहाणार नाही. गेल्या काही वर्षात भारताची लोकसंख्या ७० कोटीच्या जवळपास होती. परंतु आता मात्र ती ११० कोटीच्या जवळपास झाली आहे. त्यात वाढ होतच आहे यामुळे गरीब लोक गरीबच राहिले आहेत. श्रीमंत मात्र हिटलरप्रमाणे सत्ता गाजवू लागले आहेत आणि आपल्या श्रीमंतीच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करीत आहेत. गरीब त्या सत्तेखाली पिचले जात आहेत. पिळून निघत आहेत. याला वाली कोणी उरला नाही. जो तो आपलीच तुंबडी भरण्यात मग्न झाला आहे. सर्वसामान्य जनता मात्र होरपळून निघत आहे. यांचा भडाग्नि केव्हा पेटेल हे सांगता येत नाही. मात्र शेवट अत्यंत हृदय द्रावक असा आहे. अन् त्यात गरीबांच्या बरोबर श्रीमंताचीही राखरांगोळी होणार आहे.

पृथ्वी हा एक अतिप्रचंड ग्रह आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे तो अत्यंत छोटा म्हणजे चेंडूप्रमाणे वाटतो. सध्या शास्त्रज्ञ लोकांचे दुसऱ्या ग्रहावर जावून तिथेच स्थायिक होण्याचे प्रयत्न चालू आहेत. लोकसंख्येच्या या वाढीमुळे जसे गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे तसेच देशा देशांत हुशार कर्तबगार शास्त्रज्ञ लोकांचीही नव निर्मिती आहे. पूर्वीच्या काळात पिकविणे अन् खाणे हे शास्त्र होते पण सध्याच्या काळात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून निरनिराळे शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. ‘संकरित शेती’ हा एक विधायक असा घटक आहे आणि त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत विपूलता आलेली आहे. देश अधिक सुफल होण्याचा प्रयत्न करीत आहे.

वाढती लोकसंख्या हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देश आपले राहणीमान व स्वच्छता टिकवण्याला मुकला आहे. इथे सहजसुलभ जीवन जगणे मोठे जिकीरीचे झाले आहे. देशात, नित्य गरजा पुरवण्यासाठी निरनिराळ्या यंत्रणा आहेत पण या यंत्रणांनाही मर्यादा पडत आहेत इतकी अफाट वाढजनसंख्येची होत आहे. प्रत्येक जीवनावश्यक गरजा भागवणे देशाच्या अर्थव्यवस्थेला कठीण झाले आहे. ती कोलमडली आहे त्यामुळे लाचखोरी वृत्ती, भ्रष्टाचार यांचा अनाचार माजला आहे. समाज आपल्या देशाच्या प्रगतीबाबत उदासीन आहे. प्रत्येकाची चांगले व सुखवस्तु जीवन जगण्याची धडपड असते परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे ते अशक्य झाले आहे. लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी काहीतरी ठोस ते पावले उचलणे आता समाजाच्याच हातात आहे.

या अतिप्रचंड लोकसंख्या वाढीवर एकच पर्याय होऊ शकतो म्हणजे एका कुटूंबात एकच अपत्य जन्मले पाहिजे. कुटूंबनियोजनाचा कायदा देशातील सर्व जातीधर्मात रुजवायला हवा. वैयक्तिक मालमत्तेवर काही बंधने आवश्यक आहेत. मूले ही ईश्वराची देणगी आहे. त्यामुळे कितीही मुले होऊ दयायची या विचारांना लगाम हवा एका घरात एकच मुलगा असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारुन अनेक मुले असणाऱ्यांना शिक्षा केल्या जाव्या तेव्हा समाजात जागृती निर्माण होईल निरनिराळ्या त-हेने लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांत रुजवले जावेत.

लोकसंख्या वाढीने भावी जीवनाला किती संकटांना सामोरे जावे लागेल बेकारी, बेरोजगार, दारिद्र्य, उपासमार चोऱ्या, दरोडे या विनाशक प्रवृत्ती वळावतील, रस्त्या-रस्त्यावर एकमेकाला मारणे, खून करणे, नातीगोती किंवा माणूसकी विसरली जाईल पैशासाठी आई, मुलगा, बहिण, भाऊ, ही नाती राहणार नाहीत. जातीयवाद, प्रांतवाद यासारखे प्रश्न समाजात मूळ धरतील याचे रुपांतर म्हणजे नैतिक अध:पतन होईल. समाजात नाते या शब्दावर विश्वास राहणार नाही. लोकशाहीऐवजी दडपशाही किंवा हिटलरशाही सुरु होईल.

देशाचा विकास होण्याऐवजी देशाची अधोगती होईल. श्रीमंताना अधिक महत्त्व प्राप्त होईल, पैशाला किंमत येईल, सचोटी, प्रामाणिकपणा समाजातून हद्दपार होतील. या सर्व समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालायचा असेल तर त्यांना मूळापासून उपटून टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. समाजात नवचेतना निर्मिती हवी. यासाठी समाजात साक्षरता रुजवली जावी. साक्षरतेमूळे आपोआपच समाज जागृत होईल बऱ्यावाईटाचे अवधान राहील त्यामुळे निरनिराळे प्रयोग संशोधने होऊन अन्नधान्य उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न होईल. वाढत्या लोकसंख्येला थोडा आळा बसेल.

लोकसंख्या वाढीमूळे वेकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला समाजाला रोजगार पुरविणे अशक्य बनले आहे आणि वेकारीच्या प्रश्नाने उग्रस्वरुप धारण केले आहे. लोकशाहीचे एक शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना असे म्हटले होते की लोकशाही ज्या प्रमुख तीन तत्वांवर आधारित आहे त्यापैकी एक तत्व म्हणजे सामाजिक लोकशाही व ती आर्थिक समतेवर अवलंबून असते. पण बेसुमार लोकसंख्या वाढीने आर्थिक विषमता वाढली आहे. समाजाचा लोकशाहीवरील विश्वास नष्ट होऊन हुकूमशहा मालक बनतील पण आता सरकारकडून यावर टोस पावले उचलली जात आहेत व जीवन सुस्थिर बनू पाहत आहे. लोकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी मिळत आहेत.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी – Essay On Population in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply