वाचवील पाणी, साठवील पाणी । त्यालाच फक्त जगवील पाणी ।
पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे साठे मर्यादित असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करावा असा संदेश या उक्तीतून दिलेला आहे.
‘पाणी म्हणजे जीवन ! पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलेले आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचे साठे अल्प आहेत. हे पाणी आपण वाचवले, त्याचा योग्य वापर केला, तरच त्याचा वापर भविष्यात करता येईल.
आपले शरीर जवळजवळ नव्वद टक्क्यांहून अधिक पाण्याने व्यापले आहे. पृथ्वीवर सुमारे ७०% भाग पाण्याने व्यापला असला तरी त्यातील बहुतांशी पाणी खारट आहे. त्याचा पिण्यासाठी दैनंदिन जीवनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे मर्यादित असलेल्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचा काटकसरीने वापर केल्यास, भविष्यात त्याचा वापर करता येईल. असे म्हटले जाते की, जगात तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठीच असेल. म्हणूनच पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि आपले जीवन वाचवा !
उज्ज्वल भवितव्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब साठवला पाहिजे.
पुढे वाचा:
- वाचन एक चांगला छंद मराठी निबंध
- वाघाची मावशी निबंध मराठी
- वस्तूसंग्रहालयास भेट निबंध मराठी
- वसंत ऋतू निबंध मराठी
- वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध
- वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध
- वर्तमानपत्राचे महत्व मराठी निबंध
- मी फळा बोलतोय मराठी निबंध
- वन्यपशू आणि आम्ही मानव
- वक्तृत्व कला निबंध मराठी
- लोखंडी नांगराचे आत्मवृत्त
- ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’
- लोकमान्य टिळक मराठी निबंध
- लोकप्रिय क्रिकेटवीर – सुनील गावस्कर