स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध – Essay on Swachhta Tethe Pragati in Marathi

माझी आजी नेहमी सांगत असे की, ‘हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.’ केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा-लिखा होतील.

व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते.

अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र ‘गाडगेबाबा स्वच्छता योजना’ राबवली आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.

स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध – Essay on Swachhta Tethe Pragati in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply