पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध – Pani Adva Pani Jirva Marathi
सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.
पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही.
सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.
पुढे वाचा:
- पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी
- पाखरांची शाळा निबंध मराठी
- पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
- पहाटेचा फेरफटका निबंध मराठी
- पर्यटन निबंध मराठी
- परोपकारासाठी झटावे निबंध लेखन
- परोपकार निबंध मराठी
- परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन
- परीक्षा नसती तर मराठी निबंध
- परिचारिका निबंध मराठी
- पडक्या मंदिराचे आत्मवृत्त
- पडक्या किल्ल्याचे मनोगत निबंध मराठी
- पंचायत राज्य निबंध मराठी
- नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी
- नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी
- निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी