थांबला तो संपला, काळ पुढे चालला

काळ कुणासाठी थांबत नाही. भूतकाळाचे रुपांतर कधीही वर्तमानकाळात होत नाही. क्षणभंगुर जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. कालचक्र कुणासाठीही थांबत नाही. म्हणूनच वेळेचा सदुपयोग करून आपले जीवन सार्थकी लावणे हे केवळ मानवाच्याच हातात आहे. वेगाने पुढे सरकणाऱ्या कालचक्राबरोबर जो धावतो, तोच या जगात तरतो असा या उक्तीचा अर्थ आहे.

कित्येक लोक बाष्फळ गप्पा मारण्यात, निरर्थक बडबड करण्यात, सुस्त आणि ऐदी जीवन जगण्यात आपले बरेचसे आयुष्य वाया घालवतात. उरलेले आयुष्य झोपेत आणि पोट भरण्यात ! निष्क्रिय राहून आळसाने लोळत पडण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या आयुष्याचे सोने करणे हे केवळ माणसाच्याच हातात असते.

सूर्याचे आयुष्य एक हजार अब्जवर्ष । पृथ्वीचे आयुष्य पाचशे अब्जवर्ष । आणि मानवाचे? केवळ शंभर वर्षे ! मानवाला मिळालेल्या मर्यादित आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कार्यासाठी, मानवी कल्याणासाठी आणि यश मिळवण्यासाठी करायला हवा. ‘कल करे सो आज कर’ आजचे काम उद्यावर ढकलण्यापेक्षा उद्याचे काम आज करायला शिकले पाहिजे. कणाकणाने मधु गोळा करणाऱ्या मधमाशीचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल केली तरच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडेल. थांबू नका सतत कार्य करत राहा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.

थांबला तो संपला, काळ पुढे चालला

पुढे वाचा:

Leave a Reply