मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ – Marave Pari Kirti Rupe Urave in Marathi

प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरण पावतोच. कोणीही अमर नाही. आतापर्यंत कोट्यवधी माणसे या पृथ्वीवर जन्मली आणि मरणही पावली. त्यांतल्या कोणाचे साधे नावही आठवत नाही.

मात्र, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी अशा फार थोड्यांचीच आपल्याला आठवण येते. त्यांचा देह आता पृथ्वीवर नाही. पण त्यांचे कार्य मात्र टिकून आहे. आपल्या कार्याने ही थोर माणसे अमर झाली आहेत.

आपण फक्त स्वत:चाच फायदा पाहता कामा नये. खायचे, प्यायचे व मजा करायची, एवढेच करता कामा नये. हा स्वार्थ आहे. समाजासाठी कार्य केले पाहिजे. मानवजातीचे भले केले पाहिजे. अशा कार्याने आपले नाव अमर होते. आपला देह नष्ट झाला, तरी नाव टिकून राहते. समर्थ रामदासस्वामींनी वरील उक्तीतून हेच सांगितले आहे.

मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ

पुढे वाचा:

Leave a Reply